श्रीरामपूर, राहुरी |Shrirampur| 9 ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले


श्रीरामपूर, राहुरी |Shrirampur| 9 ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले



श्रीरामपूर, राहुरी |Shrirampur|  9 ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले





श्रीरामपूर, राहुरी |Shrirampur|  9 ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले


 श्रीरामपूर, राहुरी |Shrirampur| Rahuri


श्रीरामपूर शहरातील ऐनतपूर परिसर, इंदिरानगर, बेलापूर, उक्कलगाव, एकलहरे, टिळकनगर, रांजणखोल, राहुरी शहर, परिसर तसेच राहात्यातील ममदापूरसह अन्य काही गावांत काल रात्री 9 ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले. त्यामुळे भुकंपाची चर्चा सुरू झाली. पण हे भूकंपाचे धक्के नाहीतर के के रेंजमध्ये लष्कराचा सराव सुरू असल्याने त्याची कंपनं जाणवल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.






राहाता तालुक्यातील अस्तगाव, खडकेवाके तसेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, रांजणगाव देशमुख, सोनेवाडी, जेऊर या ठिकाणीही धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. नेहमीप्रमाणे नागरिकांचे जनजीवन सुरळीत होते. पण रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जमीन हादरली. त्यानंतर दोनदा असा प्रकार घडला. तिसरा धक्का पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जाणवला. या प्रकाराने कुठेही हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या घटनेने काही वेळातच फोनाफोनी सुरू झाल्याने तसेच सोशल मीडियावर भुकंपाचे सौम्य धक्के असल्याची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात राहुरीचे तहसीलदार शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे भूकंपाचे धक्के नसून के के रेंजमध्ये लष्कराच्या सरावामुळे हे कंपनं जाणवल्याचे सांगितले.






10 नोव्हेंबर रोजीही राहुरी फॅक्टरी परिसरात असेच धक्के जाणवले होते. यावेळी भुकंपाच्या भितीने अनेकजण घराबाहेर पळाले होते. या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने नाशिकच्या मेरी येथील भुकंप मापन केंद्राशी संपर्क साधून भुकंपाबाबत माहिती मागीतली असता तेथील भुकंप मापन केंद्रातील यत्रंणेत भूकंपाच्या धक्क्यांची नोंद नव्हती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून प्रशासनाने नगरच्या भुजल सर्वेक्षणचे आधिकारी अतूल काटकर यांना पाचारण केले असता काटकर यांनी परिसराची बारकाईने पाहणी करून नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.






पावसाळ्यात भुस्थरावरील भेगात पाण्याबरोबर हवा सुध्दा जाते. पावसाळा संपल्यावर ही हवा जास्त दाबाने भुस्तरातून वर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याची शक्यता आहे असे काटकर यांनी सांगितले होते. आता या धक्क्यांबाबत मेरी येथील भुकंप मापन केंद्राशी संपर्क साधल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने